
रत्नागिरी : राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे. कोकण बोर्डाचा निकाल ९९.८२ टक्के इतका लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्यी मुलींची टक्केवारी ९६.१४ अशी आहे, तर मुलांची टक्केवारी ९२.२१ अशी आहे.
निकालाची विभागनिहाय टक्केवारी
पुणे : ९४.८१ टक्के
नागपूर : ९०.७८ टक्के
संभाजीनगर : ९२.८२ टक्के
मुंबई : ९५.८४ टक्के
कोल्हापूर : ९६.७८ टक्के
अमरावती : ९२.९५ टक्के
नाशिक : ९३.०४ टक्के
लातूर : ९२.७७ टक्के
कोकण : ९९.८२ टक्के



