मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाशैक्षणिक
खोडदे गणेशवाडी येथील रिद्धी साळवीचे बारावी परीक्षेत यश

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील खोडदे गणेशवाडी येथील रिद्धी संतोष साळवी हिने रत्नागिरीतील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातून इयत्ता परीक्षेत विज्ञान शाखेतून ७२.३३ टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे.
रिद्धीने मिळविलेल्या या यशाबद्दल आबलोलीतील सुयश कॉम्प्युटर सेंटरचे संचालक संदेश साळवी, संचालिका सौ. सावी साळवी यांनी सामाजिक बांधिलकी स्वीकारून रिद्धी साळवी हिचा भेटवस्तू देऊन गौरव केला.



