मुख्य बातमी
महाराष्ट्र राज्याचा ६६ व्या स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते गुरुवारी ध्वजवंदन

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त १ मे रोजी सकाळी ८ वाजता पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री डॉ. उदय स्वरूपा रवींद्र सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या प्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.
राष्ट्रीय पोषाखात उपस्थित रहावे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.



