पटवर्धन हायस्कूलचे पाचवी स्कॉलरशिपमध्ये घवघवीत यश
पाचवीचे सोळा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

रत्नागिरी : उज्ज्वल यशाची शैक्षणिक परंपरा लाभलेल्या रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूल या प्रशालेला इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळाले आहे. यावर्षी झालेल्या या परीक्षेमध्ये पाचवीचे तब्बल १६ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेत.
दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पटवर्धन हायस्कूल अग्रेसर असते. यावर्षीही शिष्यवृत्तीच्या उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
भारत शिक्षण मंडळाचे पदाधिकारी श्रीराम भावे, सुनील उर्फ दादा वणजू, नचिकेत जोशी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, पर्यवेक्षक अमर लवंदे, कल्पना शिरोळकर यांनीही सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या परीक्षेमध्ये आभा घारपुरे, आराध्य फणसे, अर्णव मरगाळे, दुर्वा चव्हाण, गिरीश जाधव, हर्ष सकपाळ, इंद्रनील आठल्ये, ईशान नेवरेकर, सानवी झगडे, श्लोक धुमाळे, त्रिशा नेवरेकर, उन्नती बंदरकर, स्वराली टापरे, वल्लरी मुकादम, वरद भोये आणि वीणा बंडबे या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.
या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विभाग प्रमुख म्हणून शिक्षिका श्रद्धा बोडेकर यांनी तासिका व सराव परीक्षांचे नियोजन केले होते. परीक्षेसाठी मराठी विषयाकरिता गायत्री गवळी, मीना ताडे, श्रद्धा हर्डीकर यांनी मार्गदर्शन केले. गणित विषयासाठी रमेश कनोजे, मीनल बागवे, इंग्रजीसाठी माणिक भोये, पूनम काटकर, तर बुद्धिमत्तेसाठी श्रद्धा बोडेकर आणि हेमलता गुरव या सर्व शिक्षकांनी उत्तम मार्गदर्शन केले.
अभ्यासक्रमाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांचे उत्तम मार्गदर्शन पटवर्धन हायस्कूलमध्ये नेहमीच केले जाते. संस्था पदाधिकारी आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका यांच्या नियोजनानुसार विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारे सराव करून घेतला जातो. त्यामुळे प्रतिवर्षी पटवर्धन हायस्कूलला शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम यश मिळत आहे. यावर्षीही तब्बल सोळा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाल्याने प्रशालेच्या यशामध्ये आणखीन एक अध्याय जोडला गेला आहे.

