मुख्य बातमी

“बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसान भरपाई योजना २०१४”बाबत विधी सेवा प्राधिकरणामार्फत मार्गदर्शन

संगमेश्वर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या वतीने ग्रामपंचायत तालुक्यातील फुणगुस (ता. संगमेश्वर) येथे “बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसान भरपाई योजना २०१४” व विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पॅनल विधीज्ञ अमित अनंत शिरगावकर यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या सेवाविषयी माहिती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसानभरपाई योजना २०१४ व विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास सरपंच अशोक विठ्ठल पांचाळ, किरण गजानन भोसले, पोलीस पाटील प्रशांत सखाराम धुळ, ग्रा.पं. अधिकारी पोचरी अशोक सदाशिव भुते, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, परिचारिका तसेच फुणगुस गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!