मुख्य बातमी

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागातर्फे २४ जुलै रोजी “रत्नदुर्ग”वर दीपपूजन

रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य रत्नागिरी विभाग यांच्या वतीने शहराजवळील रत्नदुर्ग किल्ला, हनुमान मंदिर येथे आषाढी अमावस्या अर्थात दीप अमावस्येनिमित दीपपूजनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम २४ जुलै रोजी ७ वाजता होईल.

गडकिल्ल्यांचे तेज पुन्हा जागविण्यासाठी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी हा दीपोत्सव कार्यक्रम घेण्यात येणार असून, हा दीपोत्सव आपली संघटनात्मक एकता, संवर्धन कार्यातील निष्ठा व सांस्कृतिक जाणीव दर्शवणारा ठरेल. त्यामुळे प्रत्येकाने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे पाडावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी तन्मय जाधव (8379012347), दीपेश वारंग (9920905920) यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!