महाराष्ट्रमुख्य बातमी

९ जुलै रोजी भारत बंदची घोषणा; २५ कोटींहून अधिक कर्मचारी देशव्यापी संपावर

मुंबई : उद्या (९ जुलै) देशभरात २५ कोटींहून अधिक कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत. केंद्र सरकारच्या शेतकरी, किसान आणि राष्ट्रविरोधी धोरणांच्या विरोधात १० केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहकारी संस्थांनी हा भारत बंद पुकारला आहे. बँकिंग, विमा, कोळसा खाणकाम, रस्ते, बांधकाम आणि इतर अनेक क्षेत्रांतील कर्मचारी या संपात सहभागी होणार असून, यामुळे देशातील अत्यावश्यक सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या अमरजीत कौर यांनी सांगितले की, “या संपात २५ कोटींहून अधिक कर्मचारी सहभागी होतील. याशिवाय शेतकरी आणि ग्रामीण मजूरही या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.” एनएमडीसी लिमिटेड, इतर खनिज आणि इस्पात कंपन्या, राज्य सरकारचे विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे कर्मचारीही संपात सहभागी होणार आहेत. संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी मजूर संघटनांनीही या संपाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!