विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता

पुणे : गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. पारा चांगलाच वाढला आहे. राज्यातील काही शहरांमध्ये तर तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचे बघायला मिळत आहे. चंद्रपूर, नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान खात्याकडून उष्णतेच्या यलो लाटेचा इशारा देखील देण्यात आलाय. हेच नाही तर पुढील दोन दिवसांमध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. हवामानात सतत बदल होत असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचे चटके अधिक जाणून लागले आहेत. मुंबईत दुपारच्यावेळी उन्हाच्या झळा या अधिक तीव्र झाल्याचे बघायला मिळाले. विदर्भामध्ये तर कहर झालाय. अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढताना दिसतंय. चंद्रपूरमध्ये राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. मार्च महिन्यातच चंद्रपूरचे तापमान ४० अंशांच्या पुढे गेले. मार्च महिन्यातच यंदा सुर्य आक ओकताना दिसत आहे. आज नागपूरमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये, यामुळे आज तरी किमान नागपूरकरांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे.
हेच नाही तर पुढच्या दोन दिवसांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलीये. काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय. सध्या पुण्यातही तापमान स्थिर असल्याची स्थिती बघायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा वाढताना दिसत आहे. मराठवाड्यात पारा चढला आहे. होळीनंतर पारा वाढताना दिसतोय. अमरावती, अकोला आणि वर्धात कमाल तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. चंद्रपूरमध्ये आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.
कोकणातही आज उष्णता वाढणार आहे. कोकणात काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हिंगोली, जळगाव, भुसावळ, नाशिक, वाशिम, अहिल्यानगर या शहरांमध्येही तापमान वाढण्याची दाट शक्यता आहे.



