भाकर सेवा संस्थेमार्फत हुंडाविरोधी पदयात्रेत सामील होण्याचे आवाहन

रत्नागिरी : पुणे येथील कौटुंबिक हिंसाचार व हुंडाबळी प्रकरणाविरुद्ध व समाजात घडत असलेल्या अमानुष कृत्याविरोधात जनजागृती करण्यासाठी भाकर या स्वयंसेवी संस्थेने पदयात्रेचे आयोजन केले आहे. ६ जून व ७ जून रोजी आंबोळगड ते जयगड यामार्गे महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार व हुंडा विरोधी चळवळ पदयात्रा काढण्यात येणार आहे.
कै. अरुणा पाटील या सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेने १९९३ साली भाकर या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. ३२ वर्ष संस्थेने अनेक सामाजिक प्रकल्प राबवले. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे पाणलोट प्रकल्प, मजुरांच्या मुलांसाठी ४० बालवाड्या, माता व बाल संगोपन, ४५० बचत गट, गुजरात भूकंप मदत कार्य, चारा छावणी, महिला सहाय्यता कक्ष, स्वच्छ भारत अभियान, सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास,जल जीवन मिशन , महिला समुपदेशन केंद्र,लांजा व राजापूर, आजी-आजोबांचा गाव (वृद्धाश्रम) व महिला पुनरुत्थान केंद्र (महिलांना स्वत:च्या पायावर उभे करणे) असे विविध प्रकल्प यशस्वीरित्या पार पाडले.
पुणे येथील कौटुंबिक हिंसाचार व हुंडाबळी प्रकरणा विरुद्ध व समाजात घडत असलेल्या अशा अमानुष कृत्या विरोधात जनजागृतीपर पदयात्रेचे आयोजन केले आहे. ६ जून व ७ जून रोजी आंबोळगड ते जयगड यामार्गे महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार व हुंडा विरोधी चळवळ पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेमध्ये हुंडा देणे-घेणे कायद्याने चुकीचे आहे आणि त्याचे होणारे दुष्परिणाम याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वांनी या पदयात्रेमध्ये सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



