बेरोजगारांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत जिल्ह्यातील उमेदवारांना बेरोजगार उमेदवारांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे. युवक युवतींना रोजगाराची संधी आहे. जिल्ह्यातील उमेदवारांनी लाभ घ्यावा, योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत उमेदवारांना १२ महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळणार आहे. त्याकरीता दरमहा ५ हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर ६ हजार रुपये एकरक्कमी अनुदान दिले जाईल. या योजनेंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण दिले जाणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली माहिती भरावी अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आवार, नाचणे रोड, पोस्ट एमआयडीसी, रत्नागिरी कार्यालयाशी नितीश मुरकर (7972914846) आणि पांडुरंग कानडे (8421241331) यांच्याशी संपर्क साधावा.



