मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

दापोली दाभोळ रोडवरील साईड पट्टी खचली; सुदैवाने बस अपघात टळला

दापोली : दापोली-दाभोळ मुख्य रस्त्यावर २४ जुलै रोजी सकाळी भीषण अपघात होता होता टळला. प्रवाशांनी भरलेली एसटी बस रस्त्याच्या कडेला साईड देताना अचानक साईड पट्टी खचली आणि बस थोडक्यात पलटी होण्यापासून वाचली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र, या प्रकारामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हे अधिकारी जनतेच्या जीवाशी खेळत आहेत. रस्त्यांचे काम अत्यंत हलक्या दर्जाचे असून, निरीक्षण आणि देखरेख पूर्णपणे दुर्लक्षित केली जात असल्याचा गंभीर आरोप स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि समृद्ध कोकण संघटनेचे अनिष निंबकर यांनी दापोली बांधकाम विभागावर केला आहे. या घटनेनंतर निंबकर यांनी तात्काळ बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “प्रशासनाने आता तरी जागं व्हावं आणि अशा निष्काळजीपणाच्या घटना थांबवाव्यात,” असे ते म्हणाले.

दरम्यान, या मार्गावर वारंवार होणारे खड्डे, अपूर्ण साईड वर्क आणि दर्जाहीन डांबरीकरणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने पाहून रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!