मुख्य बातमीशैक्षणिक

अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

रत्नागिरी : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताना प्रास्ताविकामध्ये दिनविशेष समिती प्रमुख सौ. विस्मया कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे अभ्यास प्रेम आणि वाचन प्रेम समजावून सांगितले आणि या दोन गोष्टींमुळे आपल्या देशाला एक महामानव आणि भारतरत्न मिळालं हे पटवून सांगितले. विद्यार्थ्यांनी त्यांना समजलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या शब्द रूपामध्ये मांडण्याचा छान प्रयत्न केला.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह आणि एमसीव्हीसी विभागाचे प्रमुख श्रीकांत दुदगीकर यांनी रिझर्व बँक आणि भारतीय संविधानाचा उल्लेख करून डॉ .बाबासाहेब आंबेडकर नीटपणे समजून घेण्यासाठी त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचणे अत्यावश्यक आहे, असे सांगितले. याचबरोबर उपप्राचार्य सुनील गोसावी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी योग्य वेळी शिक्षणाचे महत्त्व ओळखून उपलब्ध संधीचा स्वतःच्या विकासासाठी फायदा करून घ्यावा आणि बाबासाहेबांसारखे महान कार्य करावे, असे आवाहन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक विद्याधर केळकर तसेच कला शाखेचे विभाग प्रमुख वैभव कानिटकर, विज्ञान शाखेचे विभागप्रमुख दिलीप कुमार शिंगाडे तसेच वाणिज्य शाखेच्या विभागप्रमुख सौ. शिल्पा तारगावकर आणि सर्व वर्ग शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनस्वी लांजेकर यांनी केले. तर सौ. प्राजक्ता सुर्वे यांनी सर्व मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!