मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

जगबुडी नदीत तिघा तरुणांचा बुडून मृत्यू

खेड : जगबुडी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तिघा सख्ख्या भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे खेड शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश रामा कांबळे, नरेश रामा कांबळे आणि कैलास रामा कांबळे हे तिघे सख्खे भाऊ मूळचे सांगली जिल्ह्यातील असून गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील कुर्ला येथे वास्तव्यास आहेत. सुट्टीसाठी ते खेड येथील आपल्या नातेवाईकांकडे आले होते. बुधवारी दुपारच्या सुमारास ते आपल्या आणखी एका नातेवाईकासह खेड शहरातील जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना नदीतील पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने चौघेही खोल पाण्यात अडकले. त्यानंतर त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा वेग आणि खोलीमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि उपस्थितांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. बचावकार्यादरम्यान एका युवकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. मात्र आकाश, नरेश आणि कैलास कांबळे या तिघा भावांना वाचविण्याचे प्रयत्न अपुरे ठरले. तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना समजताच परिसरात मोठी गर्दी झाली होती. संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!